भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात पर्यटन ही केवळ विरंगुळा किंवा मनोरंजनाची गोष्ट राहिलेली नाही, तर ती ज्ञानवर्धन आणि सामाजिक जाणीवा विकसित करण्याचे एक प्रभावी साधन बनली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक पर्यटन ही एक नवी संकल्पना उदयास येत आहे. या प्रकारच्या पर्यटनामध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील सामाजिक प्रकल्प, उपक्रम आणि लोकजीवन यांचा अभ्यास करतात. सामाजिक पर्यटनाचा मुख्य उद्देश केवळ स्थळदर्शन नसून, त्या ठिकाणच्या समाजाच्या समस्या, त्यांच्या उपाययोजना आणि बदल घडवून आणणाऱ्या प्रयत्नांची माहिती घेणे हा आहे.

अशा पर्यटनातून व्यक्तीची सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ होते. समाजात कोणत्या समस्या आहेत, त्यावर कशा प्रकारे उपाय केले जात आहेत, आणि आपणही त्यात कसा सहभाग घेऊ शकतो याची प्रेरणा मिळते. जबाबदार नागरिक बनण्याची जाणीवही वाढते. सामाजिक पर्यटनाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्थानिक लोकांशी संवाद. त्यांच्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा आणि संघर्षांचा अनुभव घेताना सहानुभूती आणि समज वाढते. त्यामुळे समाजातील विविध घटकांमधील अंतर कमी होण्यास मदत होते. वास्तव जीवनातील हे अनुभव व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात. एकूणच, सामाजिक पर्यटन ही केवळ एक प्रवासाची संकल्पना नसून, ती समाजाशी नाळ जोडणारी एक सशक्त चळवळ आहे. या माध्यमातून आपण केवळ निसर्ग आणि स्थळेच नव्हे, तर माणसांमधील नाते, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या संघर्षांची कहाणी समजून घेऊ शकतो.

तुम्हालाही सामाजिक पर्यटनाची आवड असेल तर विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या दुर्गम आदिवासी भागात लोकबिरादरीचे संचालक अनिकेत आमटे यांनी लोकसहभागातून तयार केलेले ‘तलावांचे जाळे’ नक्की बघून या ! यानिमित्ताने तुम्हाला आदिवासींशी हितगूजही साधता येईल. हा तुमच्यासाठी आगळावेगळा अनुभव असेल.

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Lok Biradari Prakalp
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Lok Biradari Prakalp

आदिवासी भागात पाणी ही केवळ गरज नसून जीवन-मरणाचा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत गावकऱ्यांच्या सहकार्याने अनिकेत आमटे यांनी उभे केलेले “तलावांचे जाळे” हे केवळ जलसंधारणाचे काम नसून एक सामाजिक क्रांतीच आहे. भामरागड परिसरात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, पण पाण्याची योग्य साठवण आणि व्यवस्थापन नसल्यामुळे उन्हाळ्यात भीषण टंचाई निर्माण होत असे. या समस्येवर उपाय म्हणून अनिकेत आमटे यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेत लहान-लहान तलाव, बंधारे आणि जलसाठे निर्माण करण्याची संकल्पना मांडली. ही कल्पना फक्त तांत्रिक नव्हती, तर लोकसहभागावर आधारित होती. गावकऱ्यांनी श्रमदान करून तलाव उभारले. या प्रक्रियेत त्यांनी केवळ पाणी साठवण्याचे काम केले नाही, तर आपली एकजूट आणि सामूहिक शक्तीही ओळखली. ‘आपलं पाणी, आपली जबाबदारी’ ही भावना त्यांच्या मनात रुजली. परिणामी, तयार झालेल्या तलावांची देखभालही गावकरी स्वत:च करू लागले. आतापर्यंत ३० तलाव बांधण्यात आले असून भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे.

Map: लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Lok Biradari Prakalp

भामरागडमधील तलावांचे जाळे हे केवळ जलसंधारणाचे उदाहरण नसून, सामूहिक प्रयत्न, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत विकास यांचे प्रेरणादायी प्रतीक आहे. ही क्रांती कशी शक्य झाली हे स्वत: अनिकेत आमटे यांच्याकडूनच समजून घेऊ यात...

‘तलाव क्रांती’ कशी घडली.... | How did Lake Revolution take place at Lok Biradari Prakalp - Aniket Prakash Amte


लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा ने आत्ता पर्यंत 30 तलाव खोदले आहेत

"गडचिरोली जिल्ह्यात भामरागड भागात पावसावर अवलंबिलेली भाताची शेती केली जाते. पाऊस चांगला पडला तर भाताचे पीक चांगले होते. पावसाळ्यानंतर शेती ७-८ महिने पडून असते. आदिवासींसाठी शासनाने चांगली सिंचनाची सोय केली नाही. अनेक नद्या ओढे नाले या भागात वाहतात. त्यावर छोटे बंधारे नाहीत. सिंचनाची सोय नाही. अनेक गावात वीज नाही. म्हणून वर्षभरात एकच पीक होते. २०१६ च्या एप्रिल महिन्यात भामरागड तालुक्यातील जिंजगाव येथील प्रगतिशील शेतकरी सीताराम मडावी यांची आणि माझी भेट झाली. गावातील हाल हवाल मी त्यांना विचारला. त्यांच्या गावात मालगुजारी तलाव आहे. अनेक वर्षांपूर्वी तो खोदण्यात/बांधण्यात आला होता. कालांतराने गाळ येऊन त्याची पाणी साठवायची क्षमता अगदी कमी झाली होती. साधारण 30 एकर भरेल इतका मोठा तो तलाव आहे. सीताराम मडावी अनेक वर्षांपासून शासनाच्या मागे लागले होते की गावच्या तलावाचे खोलीकरण करून द्या. पण त्यांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. भेटीत अशा काही व्यथा त्यांनी मांडल्या. दुसऱ्याच दिवशी मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्या तलावाची पाहणी केली. आणि ठरविले कि या तलावाचे पुनरुज्जीवन आपण लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून करून द्यायचे. मे २०१६ मध्ये १५ दिवसात जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने आम्ही त्या तलावातील गाळ काढून दिला. तलावाचे खोली करण करून दिले. त्या तलावाची क्षमता ५ पटीने वाढवून दिली. जी माती खोली करणात निघाली त्याचा वापर करून मजबूत पाल/मातीची भिंत आम्हाला बांधता आली. जुलै २०१६ मध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने तलाव अगदी काठोकाठ भरला. गावकऱ्यांच्या आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. या पाण्याचा उपयोग हिवाळी पिकांसाठी आणि मत्स्यपालन करण्यासाठी केला जात आहे."

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

"या वर्षी या गावातील लोकांनी ३ लाख रुपयांची मासोळी विकली. गावात पाणी आले की हाताला काम मिळू शकते. गावाला पैसे मिळू शकतात. यातून गावविकास होऊ शकतो हे जाणवले. पाणी साठा केल्याने विहिरींना पाणी येऊ शकते. प्राणी पक्षी झाडे आनंदात. एक तलावाचे खोलीकारण केल्यावर आणि त्याने फायदा झाला हे बघितल्यावर आमचा उत्साह वाढला. आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामसभांचे आमच्या गावातही तलाव करून द्या यासाठी विनंती अर्ज यायला लागले. आणि आता थांबायचे नाही असे ठरविले. पण तलाव निर्मिती किंवा जुन्या तलावाचे पुनरुज्जीवन ही कामे करतांना भरपूर पैसा लागणार होता आणि पुढे सुद्धा लागणार आहेत. ते कसे जमायचे ? फेसबुक / व्हॉट्सॲपसारख्या समाज माध्यमांचा उपयोग करून याकरिता पैसे उभे करता येतील असे वाटले. आणि अपील केले जनतेला. बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. एक तलाव नवीन करायचा तर साधारण १३ ते १५ लाख खर्च येतो. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय लोकांनी सुद्धा तलाव निर्मितीस खूप आर्थिक मदत केली. १०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३ मीटर खोल या मापात आपण तलाव खोदकाम केले आहे. खोदकाम केल्यावर प्रचंड प्रमाणात माती निघते. त्या मातीचा वापर करून उंच मातीची भिंत / पाल आपण बांधतो. त्यामुळे तलावाची क्षमता दुप्पटीने वाढते आणि ते पाणी लांबवर पसरलेले दिसते."

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

तलावनिर्मितीत गावकऱ्यांचा सहभाग | Village Participation in Lake Creation

"एका गावात आमची संस्था १३ ते १५ लाख रुपये तलाव निर्मिती साठी खर्च करते. शक्यतो तलावाची कामे ही डिसेंबर नंतर सुरू केली जातात आणि मे पर्यंत चालतात. या ४-५ महिन्यात साधारण आम्ही ४ तलाव खोदून / बांधून देऊ शकतो. दरवर्षी ४ तलावांची निर्मिती करू शकतो. खोदकाम हे जेसीबी/पोकलेन आणि टिपर / ट्रॅक्टरच्या साहाय्याने केले जाते. ओव्हर फ्लो बांधताना सिमेंट पाइप आणि काँक्रीटचा वापर केला जातो. बांधकाम हे शक्यतो गावातील लोकांच्या मार्फत होते. गावाची त्या तलावाशी बांधिलकी असायला हवी म्हणून गावातील लोकांनी १० टक्के खर्च तलाव खोदकाम साठी द्यावा ही आमची पहिली अट असते. आणि ही अट ग्रामसभेला मान्य असेल तरच आम्ही त्या गावात काम करतो. पण आज पर्यंत कोणीही नाही म्हटले नाही. एक प्रतिज्ञा पत्र गावाकडून आम्ही लिहून घेतो. गावात दारू विक्री होणार नाही. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व विक्री होणार नाही. गाव तंटामुक्त असेल. वन्यप्राण्यांची शिकार आणि जंगल तोड करणार नाही. वृक्ष लागवड व संवर्धन करू, इत्यादी. हे सर्व ग्रामसभा त्यांच्या लेटर पॅड वर आम्हाला लिहून देत असते. त्याचा काहीप्रमाणात नक्कीच परिणाम झालेला आम्हाला जाणवतो. गेल्या १० वर्षात आम्ही ३० गावात ३० तलावांची निर्मिती केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व अहेरी या २ तालुक्यातील जिंजगाव, बेजूर, दर्भा, दुडेपल्ली, घोटपाडी, हलवेर, हेमलकसा, हिंदूर, इरकडुमे, कोडपे, कोयनगुडा, कुमरगुडा, मडवेली, नारगुंडा, नेलगुंडा, पिडमिली, टेकला, तिरकामेट्टा , हेमलकसा टोला, लोक बिरादरी प्रकल्प, परायनार, मेडपल्ली, गुर्जा, वेडमपल्ली, मुकेला, सिपनपल्ली, कुडकेली, चंद्रा, सकिनगट्टा, तुमरकसा या गावांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाने तलावांची निर्मिती केली आहे. बऱ्याच गावांनी यावर्षी मत्स्यपालन करून १ ते २ लाख रुपये निव्वळ नफा कमविला आहे. पावसाळ्यानंतर डिझेल इंजिन पंप लावून तलावातील पाणी वापरून भाजीपाला लावतात. मका लावतात. काही वर्षांनी गावातील जनतेची आर्थिक परिस्थिती थोडीफार प्रमाणात नक्कीच बदलेल अशी आशा आहे."

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte 

तलाव निर्मितीतून झाले ‘आदर्श गाव’ | Ideal Village through Lake Creation

कोयनगुडा गाव लोक बिरादरी प्रकल्पाला लागूनच आहे. गावात “वतनकार” समाजाचे लोक राहतात. ते ओतीव कामातील उत्तम कारागीर आहेत आणि दैनंदिन वापरासाठी लागणारी विविध साधने, धान्य-भाजीपाला यांची साठवण करण्यासाठी भांडी, शोभेच्या वस्तू इ. बनवितात. जेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी एक तलाव खोदून देण्याची विनंती केली, लोक बिरादरी प्रकल्पाने ठरविले की गावात तलाव तर खोदायचाच, पण संपूर्ण गाव "आदर्श गाव" म्हणून विकसित करायचे. ग्रामसभेने नियमितपणे दारू पिणाऱ्या गावकऱ्यांवर दंड आकारण्याचे ठरविले.

तलावाचे खोदकाम सुरू करण्यापूर्वी ग्रामसभेबरोबर एक करार करण्यात आला. त्यात खालील कलमे होती. 

१. दारूबंदी 
२. तंबाखू, गुटखा, खर्रा बंदी 
३. वृक्षतोडबंदी 
४. शिक्षणाचा हक्क 
५. शिकारबंदी आणि वन्य प्राण्यांचे संगोपन 
६. तंटामुक्त गावकरार झाल्यावर काम मार्च २०१७ ला सुरु झाले. 

अंदाजपत्रक साधारण १३ लाख रुपयांचे होते. १ लाख रुपये गावातून गोळा करण्यात आले. यामुळे, गावकऱ्यात एक मालकीची भावना निर्माण झाली. काम पूर्ण होण्यास साधारण एक महिना लागला. तलावाचे आकारमान १०० x ५० मीटर आहे आणि तो ३ मीटर खोल आहे. मुसळधार पावसामुळे तलाव भरल्यास अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी "Waste Weir" नावाची यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात आली आहे. एक उघडी विहिर बांधण्यात आली आहे, जिचा व्यास १६ फूट आहे आणि जी ४० फूट खोल आहे. पाण्याची एक टाकीदेखील बांधण्यात आली आहे, जिची उंची २५ फूट आहे आणि साठवण क्षमता ५० हजार लिटरची आहे. ५ हॉर्स पॉवरचा (HP) एक सौरऊर्जेवर चालणारा पंप विहिरीतील पाणी खेचून टाकीत भरतो. कोयनगुडा गावात साधारण ७० घरे आहेत. प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यात आला आहे. पाण्याच्या टाकीवर ८.५ लाख रुपये खर्च झाले. विहिरीवर ९ लाख रुपये खर्च झाले. एवढीच रक्कम पाईपलाईनवरदेखील खर्च झाली.

"कोयनगुडा गावाला आदर्श गाव बनविण्यातील पुढची पायरी म्हणजे शौचालय बांधणे. एक शौचालय नमुना म्हणून बांधण्यात आले. गावातील लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. घरपोच पाणी दिले तरच शौचालयाचा उपयोग होईल हा विचार मनात आला आणि टाकीची निर्मिती केली. लांब ओढ्यावरून, विहिरीतून किंवा गावातील सार्वजनिक हातपंप येथून पाणी आणून कोणीच संडास बाथरूम वापरणार नाही. टाकीचे बांधकाम सुरु झाल्यावर लगेच अनेकांनी संडास बाथरूम बांधायला घेतले. घरी पाणी आल्यावर लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. आज बरेच कुटुंब संडास बाथरूमचा वापर नियमित करीत आहेत. पुढील काही वर्षांत गाव खरोखर हागणदारी मुक्त होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पाणी घरपोच असेल तरच घरात शौचालय आणि बाथरूम बांधून त्याचा उपयोग जनता करेल. आम्ही प्रयोग म्हणून जिंजगाव आणि कोईनगुडा गावात उंच टाकी, विहीर, सोलर पंप, पाईप लाईन करून दिली आहे. प्रत्येक घरात पाण्याचा एक नळ दिला आहे. याचा फायदा नक्कीच होतोय. प्रशासनाने यावर विचार करावा."

भारतातील प्रत्येक घरात नळाने पाणी गेल्यावरच गाव हागणदारी मुक्त होऊ शकेल.

कार्यकर्त्यांची कठोर मेहनत | Volunteer Contribution at Lok Biradari Sankalp

लोक बिरादरी प्रकल्पात काम करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे या कामात आम्हाला १०० टक्के सहकार्य लाभते. प्रकल्पाचे काम हे टीम वर्क आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले कार्यकर्ते उन्हातान्हात तलावांची खोदकामे सुरु असतांना जातीने त्या कामावर लक्ष ठेवून असतात. यात कुठलाच वैयक्तिक स्वार्थ नाही आणि जनतेकडून अपेक्षा नाही. निरपेक्ष भावनेने ही मंडळी काम करीत असतात. सातत्याने काम केल्यावर जे फळ मिळते त्याचा आनंद कशातही मोजता येत नाही.

४५ वर्ष निरंतर सेवा

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या गावात लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून १९७३ पासून भामरागड भागातील माडीया गोंड आदिवासी बांधवांसाठी आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा निरंतर पुरविली जात आहे. डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची आणि अनेक कार्यकर्त्यांची कर्मभूमी असलेल्या या प्रकल्पाने या भागात शिक्षण, आरोग्य आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रात गेली ४५ वर्ष निरंतर सेवा देऊन आमूलाग्र बदल घडविला आहे. आज या प्रकल्पात १ ते १२ पर्यंत शिक्षण देणारी आश्रमशाळा आहे. ६५० विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी वसतिगृह आहेत. अनेक आदिवासी बांधव या शाळेत शिकून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, फॉरेस्ट गार्ड, नर्स, तलाठी, पोलीस इत्यादि क्षेत्रात आपले भरीव योगदान देत आहेत.

२०१४ साली बाबा आमटे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त हॉस्पिटलची नवीन इमारत बांधण्यात आली. १०० रुग्ण राहू शकतील असे वॉर्ड आहेत. एक्सरे, पॅथॉलॉजी, सोनोग्राफी, अति दक्षता विभाग, डिलीव्हरी रूम, डोळे तपासणी, दंत उपचार केंद्र, कमी वजनाचे बाळ जन्माला आले तर त्यासाठी वॉर्मरची सोय आणि आधुनिक ऑपरेशन थिएटर इत्यादि सोयी दवाखान्यात उपलब्ध आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील साधारणपणे ४५००० रुग्ण दरवर्षी या दवाखान्याचा लाभ घेतात. साधारणपणे ५०० वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन या दवाखान्यात दरवर्षी विनामूल्य केले जातात.

१२० अनाथ वन्यजीवांचे मायबाप

प्रकल्पात जवळपास १२० अनाथ वन्यजीवांसाठी अनाथालय चालविले जाते. मे २०१५ रोजी लोक आग्रहास्तव भामरागड तालुक्यातील अति दुर्गम अशा नेलगुंडा गावात आम्ही साधना विद्यालय ही इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा झाडाखाली सुरु केली. आज त्या शाळेत बालवाडी ते ५ वी पर्यंतचे वर्ग आहेत. ११ खेड्यातील सुमारे १३१ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. लोक बिरादरी प्रकल्पापासून साधारण २७ किलोमीटर लांब हे गाव आहे. पावसाळ्यात या गावात पोहोचणे शक्य नसते म्हणून या शाळेला आम्ही पावसाळी सुट्टी देतो. १ जुलै ते १५ सप्टेंबर ही शाळा बंद असते. आणि पूर्ण उन्हाळ्यात ४५/४६ डिग्री तापमानात सुरु असते. शाळा कायमस्वरूपी विनाअनुदानित मान्यतेवर चालणार आहे. शाळेचा सर्व खर्च हा दानशूर व्यक्तींच्या देणग्यांवर केला जातो.


अनिकेत प्रकाश आमटे
संचालक

Comments

  1. This is great initiative. Such places should come to light

    ReplyDelete
  2. Great work by Baba Amte family for tribals

    ReplyDelete
  3. अनिकेत जी नागपूर मधे आपल या विषयावर व्याख्यान जरूर ठेवा. हे कार्य समोर येण आवश्यक आहे

    ReplyDelete
  4. this is great work

    ReplyDelete
  5. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete
  6. छान माहिती 💐

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  7. प्रेरणादायी 🌺🌺

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  8. उल्लेखनीय कार्य.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  9. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete
  10. Baba Amte legacy

    ReplyDelete
  11. खूब खूब अभिनंदन....खूब छान कार्य...अशाच कार्याची गरज पूर्ण विदर्भासहित पूर्ण राज्याला आहे. अनेक ठिकाणी लोक प्रशासनाकडे चक्कर मारून थकले.... प्रशासनाच्या कानावर जु रेगत नाही. त्यामुळे सरकारच्या योजनाचा लाभ लोकांना मिळत नाही. सर्व ठिकाणी लोकसहभागजी गरज आहे. आम्ही विहिरींसाठी प्रयत्न करत आहे पण प्रश्नांचे लक्ष नाही .

    ReplyDelete
  12. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra