आळंदी : ज्ञानाची स्वारी | Alandi Temple – Gyanachi Swaari | Temples in Maharashtra | Alandi Temple near Pune
आळंदी : ज्ञानाची स्वारी
आळंदीला पोहोचलो तेव्हा सकाळ नुकतीच उजाडत होती. इंद्रायणीच्या घाटावर हलकं धुकं पसरलं होतं. मंदिराकडून आरतीचा आवाज येत होता आणि रस्त्यांवर भक्तांची वर्दळ सुरू झाली होती.
फुलांच्या माळा, अगरबत्त्यांचा सुगंध, “ज्ञानोबा माउली”च्या जयघोषात गाव जागं होत होतं.
समाधी मंदिरात प्रवेश केला. समोर दगडी समाधी, आजूबाजूला फुलांचे हार, आणि भक्तांची अखंड रांग. टाळ-मृदंगाचा ताल, अभंगांचे स्वर, आणि मोठ्या आवाजात होणारी आरती.
१३व्या शतकात Sant Dnyaneshwar यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचा उद्देश वेगळा होता. त्यांनी संस्कृतमधील गीता लोकभाषेत आणली. धर्म आणि अध्यात्म सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
मंदिरातून बाहेर पडून इंद्रायणीच्या घाटावर आलो. नदी शांत वाहत होती. काही वारकरी अभंग म्हणत बसले होते. त्यांच्या आवाजात गडबड नव्हती, दिखाऊपणा नव्हता.
इंद्रायणीच्या पाण्याकडे पाहताना गाण्यातली ओळ आठवली —

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!