आमच्याबद्दल
व्हिजन | Our Vision
- वाचक प्रथम, जाहिराती नंतर
- मराठी भाषिकांसाठी सक्षम डिजिटल व्यासपीठ
- सकारात्मक विचार आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्यासपीठ
- मराठी संस्कृतीत रुजलेले, जागतिक आणि व्यापक विचारांनी समृद्ध
- महाराष्ट्र आणि भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध
आमची प्रत्येक कृती, आमचे प्रत्येक मूल्य, एकाच शब्दात सांगायचे तर… MARATHI!
Mindful: सकारात्मकता आणि तरुण पिढीचे मानसिक आरोग्यAudience First: जाहिरातींपेक्षा वाचक आधी
Rooted: मराठी संस्कृतीत घट्ट रुजलेले
Aspirational: जागतिक दृष्टिकोन
Trusted: विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ
Holistic: सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध
Inclusive: प्रत्येक मराठी भाषिकासाठी
स्टोरी | Our Story
एखाद्या ठिकाणाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि त्यामागील कथा जाणून घेण्याची ओढ आमच्यात नेहमीच होती. अनेक माध्यमांमध्ये प्रामुख्याने राजकारण, तात्कालिक घडामोडी किंवा वादग्रस्त विषयांना अधिक जागा दिली जाते; परंतु प्रवास, पर्यटन, स्थानिक वारसा आणि ठिकाणांच्या कहाण्या यांवर मराठीतून सातत्याने बोलणारे व्यासपीठ कमी जाणवले. याच जाणिवेतून अशा एका माध्यमाची कल्पना आकाराला आली, जे ठिकाणांबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल मनापासून बोलते.
प्रवास माणसाच्या विचारविश्वाला विस्तार देतो. एखाद्या प्रदेशाबद्दल, तेथील लोकजीवनाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि इतिहासाबद्दल जाणून घेतल्याने स्थानिक मन अधिक व्यापक बनते. आपला परिसर समजून घेत असताना दूरच्या प्रदेशांशीही नाते जोडले जाते आणि तेथूनच मराठी वाचकांसाठी विविध ठिकाणांचा आनंद देणारे, माहिती देणारे आणि विचारांना चालना देणारे व्यासपीठ उभारण्याची कल्पना पुढे आली.
या व्यासपीठाची संकल्पना करताना दोन गोष्टी विशेष लक्षात ठेवण्यात आल्या. पहिली म्हणजे वाचन अनुभव आनंददायी असावा, जेणेकरून मराठीत वाचताना वाचकांना सहजता, आकर्षण आणि आपलेपणा वाटेल. दुसरी म्हणजे हे व्यासपीठ स्थानिकतेशी जोडलेले असले तरी विचारांच्या पातळीवर व्यापक असावे; जे नव्या पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवत जगाकडे पाहण्याची दृष्टी देईल.
प्रवास आणि पर्यटन यांना चालना देणे हा देखील आमच्या प्रयत्नाचा महत्त्वाचा भाग आहे. स्थानिक पर्यटन वाढल्यास स्थानिक उद्योगांना बळ मिळते, नव्या संधी निर्माण होतात आणि प्रदेशाची ओळख अधिक व्यापक होते. त्याच वेळी प्रवास हा केवळ विरंगुळा नसून ज्ञान वाढवण्याचा, अनुभव समृद्ध करण्याचा आणि स्वतःला अधिक समजून घेण्याचा एक मार्ग आहे; या विश्वासातून हे व्यासपीठ उभे राहत आहे.
Team
- २००७-०८ साली पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा रामनाथ गोएंका पुरस्कार
- १९९५ साली जपान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.
- २०११-१२ चा म.य. दळवी शोधपत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
- पाच वर्षे राज्याच्या व्याघ्रगणनेत सहभाग घेतला.
- देशातील विविध राजकीय पक्षांच्या २० महिला नेत्यांवर आधारित ‘इंदिरा ते ममता - भारतीय महिला राजकीय नेतृत्व’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- ‘झिंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशाला भेडसावणाऱ्या एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. तो प्रश्न आहे तरुणांच्या व्यसनाधिनतेचा.
