दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

मराठवाड्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते दुष्काळ, पाणीटंचाई आणि रखरखीत भूमीचं चित्र. मात्र हीच ओळख मराठवाड्याचं संपूर्ण वास्तव सांगत नाही. पावसाळ्याच्या आगमनानंतर हा प्रदेश नव्या रूपात खुलतो. हिरवाईने नटलेले डोंगर, फेसाळत कोसळणारे धबधबे, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले जलाशय आणि जागतिक वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू यामुळे मराठवाडा पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतो. अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून म्हैसमाळच्या धुक्याने वेढलेल्या टेकड्यांपर्यंत, नाथसागरच्या विस्तीर्ण जलाशयापासून सहस्त्रकुंडच्या रौद्र सौंदर्यापर्यंत अनेक ठिकाणं पावसाळ्यात नव्याने जिवंत होतात. मराठवाड्याच्या या दुर्लक्षित पण समृद्ध पर्यटन वारशाची ओळख करून घेणं आज काळाची गरज आहे.

मराठवाड्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छ. संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, परभणी, हिंगोली या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत बरीच लहान मोठी पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीपासूनच इथल्या स्थानिक नेत्यांनी इथे कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे जिथे सामान्य सुख सोयी मिळण्याचीच भ्रांत आहे तिथे निसर्ग पर्यटन वगैरे गोष्टी तर दूरच. सोबतच निसर्ग संवर्धन करण्यात मराठवाड्याची जनता देखील तेवढीच उदासीन. त्यामुळे इथं निसर्ग पर्यटन काही म्हणावं तसं फुललं नाही. मराठवाडा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश आहे. येथे अनेक पर्यटनस्थळे आहेत जी इतिहास, निसर्ग आणि धार्मिक महत्त्व असलेली आहेत. काही प्रमुख पर्यटनस्थळांची ओळख आपण करुन घेऊ यात.

अजिंठा आणि वेरूळ लेण्या | Ajanta Caves

Ajanta Caves
Ajanta Caves

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या लेण्या बौद्ध, हिंदू आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडवतात. मराठवाडा म्हटलं की, राजधानी छ. संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) असणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा उल्लेख येतोच. संभाजीनगरला (औरंगाबाद) लेण्यांचा जिल्हा म्हटलं जातं. या दोन्ही ठिकाणांना १९८३ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लाभलाय. वर्षभरात या दोन्ही लेण्यांना स्थानिक आणि परदेशी मिळून दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात अशी इथे नोंद आहे.

Ajanta Caves

अजिंठ्यात एकूण २९ लेण्या आहेत. या सर्व लेण्या विशेषतः बौद्ध धर्मातील हीनयान व महायान पंथीयांच्या असून इथे लेण्यांत गौतम बुद्धांचे जीवनप्रसंग देखील कोरले आहेत. १९५१ मध्ये भारत सरकारद्वारे वेरूळच्या लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं गेलं. तर वेरूळचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे हिंदू, बौद्ध व जैन लेणी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. पावसाळ्यात या लेणींना भेट देण्याचा फायदा म्हणजे पावसाळ्यात अजिंठा लेण्यांच्या सभोवतालचा निसर्ग हिरवाईने नटून जातो. तसेच या ठिकाणचे खास आकर्षण असलेला ‘सप्तकुंड’ धबधबा भरून कोसळत असतो. छोट्या छोट्या कुंडामधून वाहत रौद्ररूप धारण करत हा धबधबा खालच्या प्रवाहात कोसळतो. तसेच वेरूळ इथल्या लेणीच्या माथ्यावरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. ह्या भागात पर्यटकांसाठी ज्या सोयी आहेत, त्याला अत्याधुनिक करणे ही काळाची गरज आहे.

नाथसागर, पैठण | Nathsagar, Paithan

Nathsagar, Jaikawadi Dam

गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण हे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. नाथसागर या नावाने परिचित असलेलं जायकवाडी धरण छ. संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीवर बांधलेलं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती या जायकवाडी धरणाची आहे. या धरणाचं बांधकाम १९६५ ते १९७६ असं जवळपास ११ वर्ष चाललं होतं. या नाथसागर धरणावर मराठवाड्यातील तब्बल ५ जिल्हे अवलंबून आहेत. छ. संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना धरणाचं पाणी जातं. म्हणूनच या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र असं देखील म्हटलं जातं.

या ठिकाणची आणखी एक ओळख म्हणजे रंगी-बेरंगी पक्षांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य. देश-विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत ३०० हून अधिक प्रजातीचे पक्षी या पक्षी अभयारण्यात येतात. यासोबतच पैठण हे संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान आहे. त्यांची समाधी इथेच आहे. वारकरी तसेच महानुभाव पंथाचे लोक पैठणला भेट देतात. तसेच पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान आहे, जिथं जगप्रसिद्ध पैठणी, हिमरू शाली देखील मिळतात. खर तर अश्या निसर्ग रम्य भागासाठी विदेश आणि देशातील लोकांना या ठिकाणी बोलवून प्रसार व प्रचार करायला पाहिजे. या माध्यमातून अधिक प्रगत विचार निसर्गाबाबत तयार होतील. नव्या पीढीला देखील यातून प्रेरणा मिळेल.

म्हैसमाळ हिल स्टेशन | Mhaismal Hill Station

Mhaismal Hill Station, Marathwada
Mhaismal Hill Station, Marathwada

म्हैसमाळ हे छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. म्हैसमाळ पावसाळ्यात हिरवाईनं नटून जातं. त्यामुळं पावसाळ्यात म्हैसमाळ पर्यटकांना आकर्षित करतं. खुलताबादपासून सुमारे १२ किमी आणि संभाजीनगर शहरापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. वाटेत वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि देवगिरी किल्ला आहे. म्हैसमाळ मराठवाड्याचं महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. म्हैसमाळ हा सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग असून इथे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. विविध प्रजातीच्या वनस्पती तसेच फुलं इथे बघायला मिळतात. या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी इथे असलेल्या वनस्पती कार्यशाळेला नक्की भेट द्या. पावसाळ्यात तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवागार निसर्ग आणि सगळीकडे पसरलेले ढग डोळ्यांचं पारणं फेडतात. वर्षभरात इथलं किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत असतं.

म्हैसमाळ हे शंकराच्या पुरातन मंदिराच्या अवशेषाचंही ठिकाण आहे. पूर्वीचे महेशमाळ असं असलेलं नाव नंतर अपभ्रंश होत म्हैसमाळ असं झालं. इथल्या पठारावर गिरजा देवीचं मंदिर व बालाजी मंदिर आहे. इथून घृष्णेश्वर मंदिर अवघ्या १४ किमी अंतरावर आहे तर खुलताबादेतील भद्रा मारोती मंदिर १२ किमी अंतरावर आहे. पर्वत रांगा आणि आसपासच्या सर्व भागात आपण अधिक कार्यक्षम व पर्यावरणपूरक पर्यटन तयार करु शकतो.

सहस्त्रकुंड धबधबा | Sahastrakund Waterfall

Sahastrakund Waterfall

नांदेड जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. नांदेडपासून १00 कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ‘इस्लामपूर पाटी’ पासून ५ किमी तर किनवटपासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे धबधब्याच्या अलीकडे मराठवाड्याची जमीन आणि धबधब्याच्या पलीकडे विदर्भाची जमीन आहे. त्यामुळे धबधब्याचा अलीकडचा भाग किनवट तर पलीकडचा भाग उमरखेड तालुक्यात येतो. नांदेड जिल्हा कर्नाटक आणि तेलंगणा अशा दोन राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळं सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून देखील पर्यटक येत असतात. सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर असलेलं पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. तसेच काठावर असणारा सुंदर बगिचा, येथील जंगल, वन्य प्राणी आणि विविध प्रजातींची फुलपाखरे देखील पाहायला पर्यटक गर्दी करतात. पण म्हणावा तसा विकास न झाल्यामुळे हा भाग अजूनही सुख सुविधांपासून वंचित आहे. या क्षेत्राकरिता अधिक वैज्ञानिक दृष्टीकान विकसित करण्याची आवश्यकता आहे.

माहुरची रेणुकामाता | Renuka Mata Temple Mahurgad

Mahurgad Temple
Mahurgad Temple

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं माहुरच्या रेणुकामातेचं मंदिर इथून ७० किमी अंतरावर आहे. नांदेड - गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे शीख धर्मीयांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. परळी वैजनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. ह्या क्षेत्रासाठी अधिक सोयी करणं गरजेचं आहे. जसे चांगले रस्ते, नवोन्मेष ब्लॉकचेन पद्धती तयार करणे, भारतातील अशा ठिकाणांची माहिती समाज प्रबोधनाकरिता तयार करणे, इत्यादी.

मराठवाडा हा केवळ दुष्काळ, पाणीटंचाई आणि ऐतिहासिक स्मारकांचा प्रदेश नाही; तर निसर्ग, संस्कृती, अध्यात्म आणि जैवविविधतेचा अनोखा संगम आहे. पावसाळ्यात खुलणारे धबधबे, हिरवाईने नटलेली डोंगररांग, जागतिक वारसा स्थळे आणि धार्मिक केंद्रे यामुळे हा प्रदेश पर्यटनाच्या दृष्टीनं मोठी क्षमता बाळगून आहे. योग्य नियोजन, पर्यावरणपूरक पर्यटन, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रभावी प्रचार यांद्वारे मराठवाडा महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकू शकतो.

तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा 🙏


मृणालिनी फडणवीस
माजी कुलगुरू
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ
संचालक, अकॅडमिक्स, केसीई सोसायटी, जळगाव

Comments

  1. Very good article.

    ReplyDelete
  2. छान लिहिले

    ReplyDelete
  3. मराठवाड्यात इतकं आहे माहिती न्हवत

    ReplyDelete
  4. Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  5. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete
  6. great writing by author, good to know marathwada has so many places

    ReplyDelete
  7. Nice Article madam 🙏

    ReplyDelete
  8. मी मॅडम ची विद्यार्थी राहिली आहे. मॅडम च लेखन आणि शिकवण्याची पद्धत अतिशय छान होती आणि अजूनही आहे अस दिसत - शुभेच्छा मॅडम

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती.

    ReplyDelete
  10. Marathwada is great

    ReplyDelete
  11. छान माहिती 🌺🌺

    ReplyDelete
  12. थोडक्यात छान मराठवाडा दर्शन झाले

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra