चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | प्रा. सुरेश चोपणे | Author: Prof. Suresh Chopane | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

पुरातत्त्व संशोधन आणि पर्यटनाला मिळणार नवी दिशा

चंद्रपूर म्हटले की गोंड राजांची राजधानी, किल्ला आणि मध्ययुगीन इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र येथील इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळील ‘बोर रीठ’ या स्थळावरील संशोधनामुळे चंद्रपूरचा इतिहास आणखी हजारो वर्षे मागे जात असल्याचे संकेत मिळत आहेत. इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनानुसार या परिसरात पाषाणयुग, सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील मानवी वस्तीचे पुरावे आढळले आहेत. या दाव्यांची अधिकृत पुरातत्त्वीय पडताळणी आणि उत्खनन झाल्यास चंद्रपूरच्या इतिहासाला नवे परिमाण मिळू शकते. त्याचबरोबर हे स्थळ विदर्भातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याचीही मोठी संधी आहे. या संशोधनाबद्दल प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.

इराई–झरपट संगम परिसराचा पुरातत्त्वीय वारसा

चंद्रपूर हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. नैसर्गिक संपत्ती, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरा यामुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वर्धा, वैनगंगा आणि इरई नदीच्या परिसरात वसलेले हे शहर प्राचीन काळापासून मानवी वस्तीचे केंद्र राहिले आहे.

Stone Age Vessels in Chandrapur

प्राचीन काळात हा प्रदेश दक्षिण भारत आणि मध्य भारत यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गांवर असल्यामुळे व्यापार, संस्कृती आणि धर्म यांची देवाणघेवाण येथे होत असे. सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट यांसारख्या राजघराण्यांच्या प्रभावाखाली हा प्रदेश काही काळ होता. या काळात शेती, व्यापार, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक जीवनाचा विकास झाला. वेळोवेळी झालेल्या संशोधनातून या शहराच्या प्राचीनतेबाबत आजवर अनेक रोचक खुलासे झाले आहेत.

संशोधनाच्या याच श्रृंखलेत आता चंद्रपुरातील इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ पूर क्षेत्राच्या बाहेर अतिप्राचीन गावाचे संशोधन करताना बोर नावाचे मूळ चंद्रपूरचे एक नष्ट झालेले गाव आढळले आहे. एक इतिहास अभ्यासक म्हणून मी या ठिकाणी अनेक दिवसांपासून अभ्यास करीत होतो. यातून मी अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो  की, संगमाजवळ आढळलेले हे प्राचीन गाव १० हजार वर्षांपूर्वीचे पाषाण युगीन आदीमानव, २ हजार वर्षांपूर्वीचे सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील असावे. आज हे गाव बोर रिठ म्हणून गावकऱ्यांना माहिती असून ते गवळी गाव असेल असे त्यांना वाटते. परंतु माझ्या संशोधनात तिथे १० हजार वर्षापूर्वीची पाषाणयुगीन अवजारे, ३ हजार वर्षादरम्यानच्या दगडांच्या वस्तू, २ हजार वर्षांपूर्वीची मडकी, प्राण्यांची हाडे, दात आणि लोह वितळणाऱ्या भट्टीचे लोह खडक आढळले आहेत.

मंदिराचे अवशेष | Temple Remains in Chandrapur

Temple Remains in Chandrapur

येथे प्राचीन काळात एक मंदिर होते. त्यातील दोन शिवलिंग आणि मंदिराचे काही अवशेष सुद्धा तिथे पडलेले असून हनुमान मंदिर अलीकडच्या काळातील बांधलेले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वी येथे प्राचीन नाणी आणि अलंकार सापडल्याची माहितीही दिली आहे. या परिसरात आज शेती होत असली तरी अनेक ठिकाणी जुन्या बांधकामांचे (घरांचे) ढिगारे आणि मातीचे उंचवटे दिसून येतात. त्यामुळे येथे पूर्वी मानवी वस्ती अस्तित्वात असावी, अशी शक्यता बळावते. अजून उत्खनन केल्यास अनेक पुरावे मिळू शकतात, असे माझे ठाम मत आहे. मी पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांना इथे अभ्यास करण्याचे निमंत्रण सुद्धा दिलेले आहे.

इराई आणि झरपट या नद्या प्राचीन काळापासून मानवी वस्तीला पोषक ठरल्या असाव्यात. दाताळा, नागाळा, देवाडा, आरवट तसेच पापामिया टेकडी परिसरातही प्रागैतिहासिक आणि प्राचीन संस्कृतीचे संकेत देणारे अवशेष आढळतात. या सर्व स्थळांचा एकत्रित अभ्यास केल्यास चंद्रपूर परिसरातील मानववस्तीचा इतिहास हजारो वर्षे मागे नेणारे पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 'बोर रिठ' येथे पाषाणयुगापासून सातवाहन, वाकाटक आणि यादव काळापर्यंतच्या विविध कालखंडांतील पुराव्यांचे संकेत आढळत असल्याने हे स्थळ संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

५० हजार वर्षापासून मानवाची वस्ती

झरपट आणि इराई नदीच्या काठावर पाषाणयुगीन काळात, मध्य पाषाण युगात ५० हजार वर्षापासून मानवाची वस्ती होती. पुढे ५ हजार वर्षांपासून येथे आदिवासी वस्ती करून राहायला लागले. पूर्वी सर्वत्र बारमाही नद्यांजवळच गावे असायची. ३ हजार वर्षांपूर्वी झरपट नदीजवळ पापामिया टेकडीजवळ(आजचे मेडिकल कॉलेज) गाव होते. इराई नदीजवळ आजच्या आरवट गावाजवळ, होमिओपॅथी कॉलेजजवळ तसेच पठाणपुरा गेटच्या जवळ केवळ १.२ किमी अंतरावर आणि संगमापासून १ किमी अंतरावर बोर रीठ आहे. संगमाजवळ सुद्धा एक माना गाव होते. बहुदा लालपेठ, बाबूपेठ कदाचित ह्याच गावांना हिंदू काळात लोकपूर आणि इंदूपूर म्हणत असावे. चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजांपूर्वी भद्रावती आणि भटाडा हे सर्वात मोठे गाव आणि व्यापार केंद्र होते, तसेच चंद्रपूर येथे सुद्धा पूर क्षेत्राच्या बाहेर आदिवासी गावे, हिंदू गावे होती.


Stone Age Vessels in Chandrapur

पाषाणयुगीन वस्ती

चंद्रपूर शहराचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की, इराई आणि झरपट या दोन नद्यांमुळे येथे मोठ्या संख्येने पाषाणयुगीन आदिमानव राहत होते. दाताळा, नागाळा, देवाडा आणि आरवट ह्या सर्व क्षेत्रात देशातील सर्वात मोठे पाषाणयुगीन स्थळ असून इथे मला सर्वाधिक पाषाणयुगीन अवजारे सापडली आहेत. त्याच प्रकारे झरपट नदीच्या आधारे पापामियाजवळ दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पाषाणयुगीन स्थळ आढळले. इथेसुद्धा एक गाव होते कारण ह्याच ठिकाणी शिवलिंग आणि हत्तीचे शिल्प मला सापडले आहे. या वस्त्या पाच ते दोन हजार वर्षादरम्यान तयार झाल्या.

सातवाहन ते यादव काळ

आजच्या चंद्रपूर जवळील प्राचीन वस्ती हे बोर रिठ आहे. कारण इथे एकाच ठिकाणी पाषाण युगीन अवजारे, २००० वर्षापूर्वीचे सातवाहनकालीन पुरावे, दीड हजार वर्षांदरम्यानचे वाकाटक आणि बाराव्या शतकानंतरचे यादव कालीन पुरावे आढळले आहेत. त्यावरुन बोर रिठ हे सर्वाधिक प्राचीन आणि आजच्या चंद्रपूर शहराचे मूळ गाव आहे असे पुराव्या वरून कळते. प्राचीन काळात चंद्रपूर परिसरावर सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांसारख्या अनेक राजघराण्यांचा प्रभाव होता. वाकाटकांच्या काळात विदर्भात कला, साहित्य आणि धर्म यांची मोठी भरभराट झाली. या काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मांचा प्रभाव या प्रदेशात वाढला. परिसरात मंदिरे, शिलालेख आणि धार्मिक केंद्रांची निर्मिती झाल्याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत.

गोंड राजे ते भोसले

चंद्रपूरच्या इतिहासात गोंड राजांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तेराव्या शतकात गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूर शहराची स्थापना केली आणि येथे राजधानी वसवली. त्यांनी शहराभोवती मजबूत दगडी तटबंदी, भव्य प्रवेशद्वारे आणि किल्ल्याची उभारणी केली. आजही चंद्रपूरचा किल्ला, तटबंदी आणि ऐतिहासिक दरवाजे गोंड स्थापत्यकलेची साक्ष देतात. गोंड राजांच्या कारकीर्दीत कला, संस्कृती, प्रशासन आणि व्यापार यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला.

अठराव्या शतकात मराठ्यांनी चंद्रपूरवर सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर ब्रिटिश काळात शहराचा प्रशासकीय आणि औद्योगिक विकास झाला. कोळशाच्या खाणी, जंगलसंपत्ती आणि वाहतूक व्यवस्था यांमुळे चंद्रपूरचे आर्थिक महत्त्व वाढले. स्वातंत्र्यानंतर हे शहर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक बनले.

गोंडकालीन, भोसले आणि ब्रिटिशकालीन इतिहास आज माहिती असला तरी चंद्रपूरचे मूळ गाव हे बोर रिठ हेच असल्याचे पुरावे मला मिळाले आहेत. आज मी ज्या पद्धतीने ग्रामीण भागात शोध आणि संशोधन करीत आहे त्यावरून अनेक नवी माहिती आणि नवे पुरावे मिळत आहेत.

पर्यटनासाठी नवे आकर्षण | Heritage Tourism Opportunity in Chandrapur

आज चंद्रपूरमध्ये येणारे बहुतांश पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प, प्राचीन किल्ला आणि धार्मिक स्थळांना भेट देतात. भविष्यात 'बोर रिठ' आणि इराई–झरपट संगम परिसराचा पुरातत्त्वीय वारसा जतन करून त्याचा विकास करण्यात आला, तर हे ठिकाण इतिहास, पुरातत्त्व आणि निसर्ग यांचा संगम असलेले एक वेगळे पर्यटनस्थळ बनू शकते.

तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

प्रा. सुरेश चोपणे
इतिहास अभ्यासक आणि संशोधक
चंद्रपूर

Comments

  1. महत्त्वाचे शोध कार्य. देशाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती अशा संशोधनातूनच समोर येते.

    ReplyDelete
    Replies
    1. "
      Jul 5, 2026
      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  2. great work, congratulations

    ReplyDelete
  3. संशोधनात्मक अभ्यासपूर्ण माहिती 🌺🌺

    ReplyDelete
  4. Great work and important information about Chandrapur.

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती

    ReplyDelete
  6. khhup chhan abhyas

    ReplyDelete
  7. "
    Jul 5, 2026
    तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete
  8. संशोधन पूर्ण माहिती

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra