आदि कैलास यात्रा: श्रद्धा, साहस आणि निसर्गाचा अद्भुत संगम | Author: Dr. Prachi Deshpande | Mansarovar Yatra | Incredible India

कैलास मानस सरोवर यात्रेला भारतातूनच जाण्यासाठी हिमालयातून रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले तेंव्हापासूनच या रस्त्याने जावे असा विचार सुरू झाला. कोविड नंतरच्या काळात मात्र या रस्त्याचे बरेचसे बांधकाम काही पक्क्या तर काही कच्चा स्वरुपात झाले होते; आणि मग गुगलवरुन कैलासची माहिती घेतांना कैलास मानससरोवर, आदि कैलास, किन्नर कैलास, मणी महेश कैलास आणि श्रीखंड कैलास या पंच कैलासची माहिती मिळाली. ही पाचही कैलासाची ठिकाणे हिमालयात वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यापैकी कैलास मानससरोवराला अनेक व्यक्ती जाऊन आलेल्या आहेत. पण इतर ठिकाणे मात्र आपल्याकडे फारशी प्रचलित नाहीत. शिवाय ही ठिकाणे ॲडव्हेंचरस असल्याने जास्त लोक जात नाहीत. याच दरम्यान उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाचे कुमाऊँ मंडल विकास निगम (केएमव्हीएन) आणि ट्रीप टू टेम्पल यांच्यातर्फे नागपुरातील आम्ही आठ जणांनी ऑनलाईन बुकिंग केले. पुढे त्यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनेनुसार फिटनेस सर्टिफिकेट, ॲफिडेव्हीड, परमीट, पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक पूर्तता करुन २४ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत आदि कैलास यात्रेच्या १३ व्या जत्थ्यात आम्ही समाविष्ट झालो. दिल्लीमार्गे काठगोदाम येथे पोहोचलो आणि तिथून आमच्या यात्रेला खरी सुरूवात झाली.

Kailasa

भीमताल, निम करोली बाबाचे मंदिर

भीमताल

काठगोदामपासून ३० कि.मी. अंतरावर एक मोठा तलाव आहे. इथे भीमाने गदा मारली त्या जागेवर पाणी निघाले म्हणून याला भीमताल म्हणतात. तलावाच्या मधोमध एक बेट आहे. येथील आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य आणि रात्रीच्या वेळेस लायटिंग व बोटिंग अतिशय विलोभनीय आहे. येथे अनेक सिनेमांचे शुटींग झालेले आहे. त्यानंतर पहाडीवर ३० किमी पुढे कैची धाम येथे निम करोली बाबाचे मंदिर आहे. या बाबांची आई हनुमानाची अवतार होती, अशी आख्यायिका आहे. इथल्या मेडिटेशन सेंटरमध्ये अनेक थोर व्यक्ती वास्तव्यास व ध्यानधारणेसाठी येऊन गेल्यात व आजही येतात; पण ते इतरांना भेटत नाहीत. त्यानंतर अल्मोडा येथे नवसाला पावणारे गोलू देवता मंदिर आहे. इथे लहान आकारापासून तर मोठमोठ्या आकाराच्या घंट्या नवसाच्या चिठ्ठ्या लावून बांधल्या आहेत म्हणून याला ‘घंट्ट्यांचे मंदिर’ असे म्हणतात. याच मार्गावर पुढे जागेश्वर धाम येथे उंचच उंच वृक्षांच्या खाली श्री महादेवाचे आणि श्री नागेशाचे हेमाडपंथी व पुरातन काळातील अत्यंत प्रसिद्ध असे मंदिर असून या ठिकाणी विवाह सिनेमाचे शुटिंग झालेले आहे.

Mansarovar Travel Experience

पहिला बेस कॅम्प पिथोरगड

यात्रेतील आमचा पहिला बेस कॅम्प होता पिथोरगड. तेथे पोहोचताच केएमव्हीएनच्या वतीने आमचे सर्वांचे हार घालून व ओवाळून स्वागत झाले. ओम नम: शिवाय यावर आम्ही सर्वांनी छान फेरा धरला. याच ठिकाणी आमचे पहिले ब्रिफिंग होऊन आम्हाला पुढल्या यात्रेची व त्यासंबंधी घ्यावयाच्या दक्षतेची माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी आम्ही भारताच्या नकाशावर असलेले शेवटचे गाव धारचुला येथे गेलो. तिथे मध्ये काळी नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला नेपाळ आहे. तेथील चेकिंग ऑफिसमध्ये आधारकार्ड जमा करुन हँगिंग झुल्याने आम्ही नेपाळमधील दारचुला येथे बाजारात गेलो. बाजारात फिरलो, खरेदी केली आणि संध्याकाळी परत आलो. गुंजी या मिलिटरी बेस कॅम्पला जाताना रस्त्यांचे काम सुरू असल्याने थांबावे लागले. आता बर्फाच्छादित पहाडांना सुरूवात झाली होती. त्यामुळे खूप थंडी होती. पण व्यवस्थाही अत्यंत चांगली होती.

आदि कैलास

शिवमंदिर, पार्वती सरोवर आणि आदि कैलास

दुसऱ्या दिवशी पहाटेच सहा वाजता बोलेरो चार सीटर्स गाड्यांनी निघालो. पांडव गुफा तसेच हिमालयातील शंकर, पार्वती, गणपती, पंच नागाच्या व इतर अनेक देवदेवतांच्या प्रतिमा पहात पहात तसेच नेपाळ, तिबेट आणि चीन सीमवरील परमीट घेऊन सकाळी १० वाजता जॉलिंग काँग या कॅम्पला पोहोचलो आणि तिथून ६ किमी अंतरावर घोड्याने आणि काही लोकांनी पायी सुद्धा पहाड तसेच झरे पार करीत शिवमंदिर, पार्वती सरोवर आणि आदि कैलास या स्थळांचे दर्शन घेतले. तेथील अप्रतिम निसर्ग साैंदर्य म्हणजे जणू स्वर्गच. यात्रेतील पुढला टप्पा होता गौरीकुंडाचा. ३ किमी अंतरावर १२,५०० फूट उंचीवर असलेल्या या गौरीकुंडापर्यंत पोहोचणे म्हणजे धाडसच. आमच्यापैकी काही लोकच तेथवर पोहोचू शकले. प्राणवायूची कमरता असल्याने श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो. अर्थात येथील लष्करी रुग्णालय सुसज्ज असून तेथे चोख व्यवस्था आहे. तरीही येथे जाताना मानसिक आणि शारीरिक धैर्याची गरज मात्र निश्चितच जाणवते. साधारणत: दुपारी २ वाजतानंतर येथे आभाळ,वादळ, पावसाला सुरुवात होत असल्याने लवकरच बेसकॅम्पला परतावे लागले.

Kailasa Parvat

ओम पर्वत

आमचे या यात्रेतील खरे आकर्षण केंद्र होते ते म्हणजे ओम पर्वत. सकाळी ६ वाजताच आम्ही उत्साहाने गाड्यांनी निघालो. काही ठिकाणी बांधकामामुळे रस्ते बंद होते तर काही ठिकाणी खूप पाण्यामधून जावे लागले. बऱ्याच भागात पहाडाचे सुळखे खूप खाली असल्याने हे ५०-६० किमीचे अंतर पार करण्यास वेळ लागला. १० वाजता आम्ही ओम पर्वतावर पोहोचलो. हा पर्वत चीनमध्ये असून त्याचे बर्फाच्छादित ‘ओम’ लिहिलेले नाव भारताच्या दिशेला आहे. उत्तर भारत-चीन सीमेवर हा पर्वत आहे. नशिबाने आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे धुके,वादळवारा, पाऊस काहीच नव्हते. आम्ही तिथे होम करुन ओम नम: शिवायचा जप केला. त्यावर सुंदर फेरा धरला. फोटो सेशन झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता अचानक इतके ढग दाटून आले की पर्वतच दिसेनासा झाला. अंधारुन आले आणि त्याच जागेवर निसर्गाचा एक वेगळाच अविष्कार पहावयास मिळाला. आम्ही व्यास गुफा, काली माता मंदिर, नाग पर्वत, नाभी पर्वत पाहून नाभी येथे गेलो. तिथे आमच्या स्वागतात एक कार्यक्रमही झाला.

पाच पांडव पर्वत

लॅण्ड स्लाईडींगचा थरारक अनुभव

पुढल्या दिवशी आम्हाला नाभीवरुन धारचुलाला जायचे होते. पण आदल्याच दिवशी पांगळा गावात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने रस्ता बंद होता. दोन तास थांबल्यावर रस्ते मोकळे झाले आणि १२ गाड्यांमध्ये आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. अर्ध्या तासानंतर मार्गात मलघट्टा या ठिकाणी भीषण लॅण्ड स्लाईडींग झाले. रस्त्यावरच दगडांच्या टेकड्या उभ्या झाल्या होत्या. आम्ही पुन्हा अडकलो. १५ मिनिटांनी लष्कराने येथे लॅण्ड स्लाईडींगचा धोका असल्याची सूचना दिली आणि इथे थांबू नका असा सल्ला दिला. तेव्हा आम्ही सर्वच सॅक बॅग घेऊन धावतच पुढल्या दगडी पार करु लागलो. सुरुवातीला वाटले की पहिले वळण पार केले की झाले. पण कसचे काय? जवळपास अर्धा किमीचा रस्ता बंद असल्याने ८ ते १० फूट उंचीचे मोठेमोठे दगड तेही घसरणारे दगड आम्ही पार केले. आणि सर्वजण सुखरुप आलो. एकीकडे खोल दरी, नदी आणि दुसरीकडे कोसळलेले पहाड व दगड यातून आम्हाला बाहेर काढण्यास खरी मदत केली ती वाहनचालक आणि स्थानिक लोकांनी. त्यांनी विशिष्ट पद्धतीने एकएक करुन सर्वांना बाहेर काढले. पण काय? पुढल्या दहा मिनिटांच्या आताच आमच्या समोर पुन्हा जोरदार लॅण्ड स्लाईडिंग झाले. मग मात्र आम्ही धावतच पुढला टप्पा गाठला आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचलो. तीन बॅग या लॅण्ड स्लाईडिंग मध्ये राहिल्या होत्या. त्या जळून गेल्या. यावरुन त्या अपघाताची कल्पना आली. आम्ही सर्वांनीच श्री आदि कैलासला नमस्कार केला. तेथील लोकांचे आभार मानत त्यांना पैसे दिले. पण ते देतांना त्या पैशांपेक्षा आपल्या जीवाचे मोल किती जास्त आहे, हे प्रत्येकालाच जाणवत होते.


With Friends & Family

दोन तासानंतर वातावरण थोडफार शांत झाले. दुसऱ्या बाजूने काही गाड्या आल्या. आणि आदि कैलासचा जयजयकार करुन आम्ही बेसकॅम्पला आलो. तिथे आमचे स्वागत झाले. टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी आमच्या मुलाखती घेतल्या. दुसऱ्या दिवशी केएमव्हीएनच्या वतीने सत्कार करुन प्रमाणपत्र देण्यात आले. मग पुढचा प्रवास आनंदात झाला. त्यानंतर मात्र सतत लॅण्ड स्लाईडिंग होत असल्याने या यात्रेसाठीचा यात्रेकरुंचा परवाना रद्द करण्यात आल्याने आमची त्याकाळातील शेवटची यशस्वी बॅच राहिली, हे आमचे सुदैव आहे. आणि मग खऱ्या अर्थाने पटले की, ‘आदि कैलास यात्रा ही पैशाची नसून नशिबाची आहे.’

कैलास मानसरोवर यात्रा मार्गदर्शक | Kailash Mansarovar Yatra Marathi Travel Guide

१. प्रवासासाठी सर्वोत्तम कालावधी

मे ते सप्टेंबर हा यात्रेसाठी योग्य काळ आहे. जून ते ऑगस्ट या महिन्यांत सर्वाधिक यात्रेकरू जातात.

२. प्रमुख प्रवासमार्ग

अ) भारत सरकार मार्गे उत्तराखंडमधील लिपुलेख दर्रासिक्कीममधील नाथूला

कालावधी: साधारण २१ ते २५ दिवस

ब) नेपाळमार्गे काठमांडू येथून रस्ता किंवा हेलिकॉप्टरद्वारे

कालावधी: निवडलेल्या पॅकेजनुसार १० ते १६ दिवस

३. आवश्यक कागदपत्रे
  • किमान ६ महिने वैध असलेला पासपोर्ट
  • चीन (तिबेट) प्रवेशासाठी आवश्यक व्हिसा व परवानग्या
  • वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र
  • अधिकृत टूर ऑपरेटरमार्फत नोंदणी
४. शारीरिक तयारी

यात्रेदरम्यान ४,५०० ते ५,६०० मीटर उंचीवर प्रवास करावा लागतो. दररोज ५ ते १५ किमी चालण्याची तयारी असावी. हृदयविकार, दमा किंवा इतर गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

५. अंदाजे खर्च
  • नेपाळमार्गे: सुमारे २ लाख ते ४ लाख
  • (पॅकेजनुसार) भारत सरकारमार्गे: शुल्क त्या वर्षाच्या नियमांनुसार बदलू शकते

६. प्रवासासाठी आवश्यक साहित्य

उबदार कपडे, जॅकेट, हातमोजे, माकडटोपी, ट्रेकिंग शूज, सनग्लासेस आणि सनस्क्रीन, वैयक्तिक औषधे, पाण्याची बाटली, टॉर्च, पॉवर बँक,आवश्यक ओळखपत्रे व कागदपत्रांच्या प्रती

७. महत्त्वाच्या सूचना

उंच प्रदेशातील हवामान क्षणाक्षणाला बदलू शकते. पुरेसे पाणी प्या आणि शरीराला उंचीशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्या.स्थानिक प्रशासन आणि मार्गदर्शकांच्या सूचनांचे नेहमी पालन करा. पर्यावरण स्वच्छ ठेवणे आणि धार्मिक स्थळांचा आदर करणे ही प्रत्येक यात्रेकरूची जबाबदारी आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही केवळ पर्यटन नसून श्रद्धा, संयम, आत्मिक साधना आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव देणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा आहे.

कमेंट्स मध्ये आपले मत / अनुभव नक्की कळवा! 😊😊


डॉ. साै. प्राची दिलीप देशपांडे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख (सेवानिवृत्त)
महिला महाविद्यालय
 नंदनवन, नागपूर

Comments

  1. ही यात्रा अनोखी आहे

    ReplyDelete
  2. नशीब बलवत्तर

    ReplyDelete
  3. खूप छान अविस्मरणीय अनुभव

    ReplyDelete
  4. मॅडम, छान लिहिलं

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra