फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

नागपूरच्या आध्यात्मिक आत्मगौरवाचा इतिहास

महाराष्ट्राची उपराजधानी व सतत आणि निरंतर विकसित होणारे भारतातले एक महत्त्वाचे महानगर म्हणजे नागपूर होय. पण काय तुम्हाला माहित आहे काय की, नागपूरचे आधीचे नाव होते फणिंद्रपूर. याबाबत अनेक दस्तऎवजात उल्लेख आढळतो. ‘फणिपुरे महाग्रामे, समस्ता: पुरवासिन:’ अशी ओळही प्रसिध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुमारास कदाचित नागपूर हा उल्लेख करणे प्रारंभ झाले असावे. आज जरी हा भाग मनुष्यवस्तीनी गजबजलेला असला तरी कोणी एकेकाळी येथे घनदाट अरण्य होते. परंतु नागपूर येथे जरी पूर्वी अरण्य व वन असले तरी ही  तपोभूमी होती. इथे पूर्वी गुफाही होत्या. या गुफांमध्ये तपश्चर्या करणारे अनेक साधु-संत॒-ॠषी-मुनी-तपस्वी राहत असावेत. कालांतराने येथे मनुष्य वस्ती व तिचा सर्वांगिण विकास, प्रगत व प्रगल्भ अशी जीवनपद्धती विकसित होत गेली. त्याचाच अलीकडचा वारसा म्हणजे जुन्या नागपुरात घरोघरी दिसणारी समाधी स्थळे होत.

अनेक पुरातत्त्वांच्या पुराव्यानुसार नागपूर येथे रामायण काळापासून वस्ती असल्याचे आढळते. गझेटिअर (१९०३) यात नोंद आहे की रामायणात नागपूरचा उल्लेख आला आहे. २००८ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाने नागपूरची प्राचीनता सिद्ध करणारे पुरावे शोधून काढलेत. याचा संबंध थेट महापाषाण कालीन युगासोबत जोडला गेला आहे, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

सध्याचे नागपूर हे राजे बख्त बुलंदशहा यांनी १७०२ च्या सुमारास वसविल्याचा इतिहास आहे. आधी सुमारे बारा वस्त्या घेऊन याची रचना करण्यात आली. मनुष्यवस्तीसह येथे विविध प्रथा-परंपरा-संस्कार-संस्कृती-ज्ञान-शिक्षण-उद्योगधंदे आदींनीयुक्त समाज उदयास येऊ लागला. त्याबरोबर सामाजिक-राजकीय-ध्यात्मिक वारसाही उदयास येऊ लागला. विविध कार्याची आद्य कर्मभूमी ही नागपूर ठरली. अशा समृद्ध इतिहासाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण नागपूरचे अवलोकन करतो तेव्हा लक्षात येते की आपला समग्र विकास साधता साधता येथील विविध परंपरा या समाजास, सर्व सामान्यांसाठी मार्गदर्शक व आधारभूत ठरलेल्या आहेत. या परंपरेने विभूषित अनेक गुरु घराणी हे नागपूरचे भूषण आहे. उदाहरणार्थ एकनाथपंथी परंपरा असणारे देवघर, माधवानाथ महाराज यांचा मठ, अयाचित मंदिर आदी घराणी ही नागपूरकरांच्या गुरुस्थानी होती. आजही या घराण्यांमध्ये अनुग्रह देण्याची परंपरा दिसून येते . श्रध्दावान नागपूरकर हे कुठल्यातरी घराण्याचे अनुग्रहित असल्याचे दिसून येते.

Samadhis in Old Nagpur

घरोघरी आहे समाधी स्थळ

अशाच या थोर गुरुपरंपरेंच्या घराण्यात अनेक सिद्ध पुरुष, संत, महात्मे योगी होऊन गेलेत. ज्यांनी आपली ईह जन्माची यात्रा संपवताना समाधी घेतली. घराघरांमध्ये असलेली ही समाधी स्थळे नागपूरच्या ध्यात्मिक वारसेची सुह्र्द खूणच होय. आपल्याशी निगडित भक्तजनांमध्ये चैतन्य निर्माण करून त्यांना निरंतर आनंद व समाधान देणे, त्यांना भक्ती-उपासना मार्गाचा अवलंब करायला लावणे आदींची साक्ष ठरलेली ही समाधी स्थळे होय. चित्तातील चेतना जागृत करून समाजातील चेतनाशक्तीचा उपयोग एका विधायक कार्यासाठी करणे, प्रसंगी त्यासाठी सर्वसंगपरित्याग करणे, हे तर कोणीही नागपूरकरांकडून शिकावे. मग तो स्वातंत्र्यलढा असो , सामाजिक जागृती असो की एखादे आंदोलन असो. समाज व राष्ट्र उन्नतीसाठी नित्य आपल्या भक्तांना सकारात्मक व तेजस्वी शिकवण, ही समाधी स्थळे देत आली आहेत. आज जरी हे गुरु देह रूपाने नसले तरी त्यांचे चैतन्य भक्तांना नित्य मार्गदर्शक ठरते व त्यांची शिकवण जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती प्रदान करते.अश्याच काही समाध्यांची माहिती आपण जाणून घेऊ यात.

साल्पेकर देवघर येथील समाधी

गजानन महाराज यांचा मठ | साल्पेकर यांचे देवघर

जुन्या पिढीतील अनेक कुटुंबांचे गुरूस्थान असलेले देवघर. महाल संघ कार्यालयाजवळ ही मठवास्तु आहे.

दत्तं जनार्दनं, नाथं, उध्दवं केशवं तथा।
गणेशं पद्मनाभं च गोविंदं ज्ञानदं शुभम्।
मनोहरम नृसिंहं च गजानन गुरु तथा ।
वंदे तत् शिष्यं गोविंदम् तत् शिष्यं च हरिहरम् ।
तत् शिष्यं रामचंद्रम् च सद्‌गुरुभ्यो नमो नमः ।
एषा परंपरा भक्त्या स्मर्तव्या शिष्य साधकैः ।।

वरील ओळींत या सांप्रदायिक गुरुशिष्यांची परंपरा असलेल्यांचा उल्लेख आहे. सध्या देवघराची-मठाची वास्तू पडीत असून तेथे केवळ समाध्यांवर छत्र आहे. पूर्वी त्याच्या अवतीभोवती जंगल होते. पूर्व दिशेने देवघरात प्रवेश करतांना उजव्या हाताला दिसणारी विहीर फार पूर्वीपासून आहे. गुरूपरंपरेतील सद्‌गुरू श्री. गणेश आणि त्यांचे शिष्य पद्मनाथ यांची समाधीस्थाने मठाच्या बाहेर आहेत. भारतातील सकल संतवृंदांच्या मुक्कामचे  हे स्थान असे. आजजरी साल्पेकर घराणे इथे निवासास नसले तरी परंपरेचे समस्त उत्सव त्यांच्या राहत्या ठिकाणी साजरे होतात. सकल भक्तगण आजही राम जन्मोत्सव, अखंड भजन सप्ताह, गंगा लहरी पुराण, भागवत सप्ताह, त्रिपुरी पौर्णिमा आदी उत्सवात उत्साहाने सहभागी होतात.

श्री विश्वंभर आबांचा मठ

विश्वभर आबा मठ, लाकडी पुल, महाल

नागपूर शहरातील महाल विभागात लाकडीपूल परिसरात चिरंजीवी रुग्णालयासमोर विश्वंभर आबा मठ आहे. या वास्तूच्या तळमजल्यात लाकडी कोरीव खांब तसेच नक्षीकाम केलेले एक देवघर आहे. या देवघरात विठ्ठल रखुमाई यांच्या सुबक मूर्ती आहेत. या मूर्ती स्थानापासून काही अंतरावर पुढे पण देवघरातच श्री. विश्वंभर आबा यांची काळ्या व पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेली पिरॅमिडच्या आकाराची संजीवन समाधी आहे. या वास्तूची देखभाल सध्या जामकर कुटुंबीयांकडे आहे. श्री. विश्वंभर आबांची पुण्यतिथी, गुरुपूजा, श्रीव्यंकटेश तसेच शारदीय देवीचे नवरात्र, श्रीमल्हारीमार्तंड नवरात्र, इत्यादी उत्सव समस्त भक्तांच्या उपस्थितीत साजरे होत असतात.

या व अश्याच प्रकारच्या उपासना पध्दती जवळपास समस्त समाधी स्थानांवर आढळतात. प्रत्येक समाधीस्थळावर साजरे केले जाणारे उत्सव जरी भिन्न असले, पद्धती वेगळ्या असल्या तरी आत्मजागृती व ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य मात्र एकसारखेच आढळते. सगुणाची उपासना करता करता निर्गुण तत्त्वापर्यंत नेणे, जीवशिव ऎक्याच्या प्रवासपर्यंत भक्तांचा प्रवास घडवून आणणे, हे उच्चकोटीचे कार्य या समाधीस्थ योगीजनांचे आहे. या ध्यात्मिक आत्मगौरवाचा इतिहास रचणारी जागोबा महाराज, उदासीन बाबा, श्री उपासराव महाराज, तानकोपंत, गोविंदराव महाराज, गणोबा महाराज, साध्वी यमुनाबाई , निकालास महाराज, माधवनाथ महाराज, सुदाम बुवा,सदाशिव भट्ट , तेलीबुवा यांचे गुरू, ब्रह्मचारी बुवा, भुरे महाराज, गणोबा महाराज, लद्दू महाराज, आबाजी महाराज, मुकुंद गोसावी ,मुकुंद महाराज साधू ,भूतेश्वर महाराज इत्यादींची समाधी स्थळ होत.

जामकर यांचे 'योगीराज'

डी डी नगर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. राम जामकर यांनी लिहिलेल्या योगीराज या पुस्तकामध्ये फणिंद्रपुरातील ५५ हून अधिक समाधी स्थळांची माहिती दिलेली आहे. त्यांचा इतिहास, परंपरा, साजरे केले जाणारे उत्सव यांचे सविस्तर वर्णन या पुस्तकात केलेले आहे. तसेच काही भग्न झालेल्या खंडित पावलेल्या समाध्यांचीही यादी जामकरांनी दिलेली आहे. यापैकी काही समाधी या संजीवन तर काही नाम समाधी असल्याचे म्हंटले आहे.

रामायण कालापासून तपोभूमी असलेल्या या फणिंद्रपुरास संत, साधू, योगी, महात्म्यांच्या तपश्चर्येमुळे एक तेजोवलय प्राप्त झालेले आहे. अलीकडच्या काळातल्या या समाध्या श्रद्धा-भक्ती-साधना-उपासनेचे केंद्र आहेत. हे समाधीस्थ योगीजन सर्वसामान्यांना अतृप्ततेकडून आत्मतृप्तेकडे घेऊन जाणारे आहेत. विविध परंपरेने नटलेली फणिंद्रपूरची भूमी म्हणूनच पुण्यभू भारताचे परमवैभव आहे. स्वतः सह संपूर्ण विश्वास मांगल्याने परिपूर्ण करून सनातन धर्माची ऊर्जा अबाधित ठेवण्याचे कार्य ही समाधी स्थळं करतात आहे. त्याचबरोबर फणिंद्रपुराचा आत्मगौरवही वाढवतात आहे. आपणही या समाधी स्थळांना निश्चितपणे भेट देऊन येथील दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्यावा, अशी सर्व वाचकांना नम्र विनंती.

समाधी शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली?

समाधी शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे – ‘ सम्यक् आधीयते मनः यस्मिन् ।’ म्हणजे ज्या अवस्थेत मन योग्य प्रकारे स्थिर ठेवले जाते, ती समाधी. हा शब्द सम्+आ+धा असा बनला आहे. ‘सम्’ उपसर्गाचा अर्थ ‘योग्य रीतीने’, ‘आ’ उपसर्गाचा अर्थ ‘पर्यंत’आणि ‘धा’ धातुचा अर्थ ‘ठेवणे’ असा आहे. योगशास्त्रात ‘समाधी’ हा शब्द चित्ताची एकाग्रता आणि चित्तवृत्तींचा निरोध या दोन्ही अर्थांनी वापरला असला, तरी व्यवहारात ‘समाधी’ हा शब्द निरोधापेक्षा चित्ताच्या एकाग्रतेसाठी अधिक वापरला जातो. अशी ही समाधी घेतांना जीवनभराची साधना, योगनैपुण्य, आत्मसंयम अश्या अनेक बाबींची आवश्यकता असते. या समाधी अवस्थेला एखाद्या संयात्मा योगीपुरूषच प्राप्त होऊ शकतो. अश्या अनेक समाधीस्थ योगीजनांच्या पावन वास्तव्याने पुनित झालेले स्थान म्हणजे फणिंद्रपूर म्हणजेच नागपूर.

श्रीमत पंत प्रधान उभयता भेटी ।
होतांची हर्षली धरा सुखवृष्टि ।
मुक्काम फणींद्रपुराहुन महाराज श्रीमंत ।
सुमुहुर्ते डेरे दिधले संगमावरतं ।


तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️


️सौ मृणालिनी राजेश वाघमारे
संचालिका, संस्कार सृष्टी
संस्कृत - मराठी शिक्षा केंद्र

Comments

  1. इतकी वर्षं नागपुरात राहूनही मला या या समाधींबद्दल माहिती नव्हती. छान माहिती.

    ReplyDelete
  2. very interesting information i didnt know

    ReplyDelete
  3. Very nice article and very nice platform

    ReplyDelete
  4. छान माहिती

    ReplyDelete
  5. सुंदर माहिती 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  6. Interesting artcl

    ReplyDelete
  7. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete
  8. खूप छान माहिती मिळाली 🙏

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra