श्री चिंतामणी | Chintamani Ganesh | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide
श्री चिंतामणी
ऋग्वेदाशी संबंध दाखविणाऱ्या श्रीक्षेत्र कदम्बपूर म्हणजेच आजचे विदर्भातील यवतमाळपासून २० किमी अंतरावर असणारे कळंब क्षेत्री श्री चिंतामणीचं मंदिर आहे.कळंबचा गणपती म्हणून लोकप्रिय असलेल्या या गणपतीची प्राणप्रतिष्ठा प्रत्यक्ष कदंब ऋषींनी केली आहे. त्यांच्या नावावरुनच गावाला कळंब हे नाव पडले. श्रीचिंतामणी अतिशय जागृत देवस्थान आहे. या मूर्तीची स्थापना खूप खोलवर करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा चक्क सभामंडपाच्या पातळीपासून २३ फूट खोल आहे. खाली उतरण्यासाठी २९ पायऱ्या आहेत. गाभाऱ्यात गणेशकुंड आहे. या कुंडात दर १२ वर्षांनी गंगा अवतरते. त्याला गणेशभेट असं म्हटल्या जातं.
या कुंडातील पाण्यात त्वचारोग, कुष्ठनाश करण्याची क्षमता असते,अशी श्रद्धा आहे. या काळात येथे भरणाऱ्या यात्रेत हजारो भाविक त्या तीर्थात स्नान करुन पापक्षालन करतात.
श्री चिंतामणी | Chintamani Ganesh | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide
गौतम ऋषीच्या शापाने कुष्ठरोगी झालेल्या इंद्राला गणपतीने शापमुक्त करुन स्वस्थानी विराजिले असं म्हणतात. त्याकरिता इंद्राने येथील गणपतीची तपश्चर्या केली होती,अशी कळंब गणपतीची महती आहे.
या चिंतामणीची मूर्ती अतिशय देखणी असून ती शूर्पकर्ण रुपातील आहे. हे मंदिर वाकाटकांच्या राजवटीत बांधले गेले आहे. हा चिंतामणी दक्षिणामुख आहे. गणेश चतुर्थीपासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत येथे उत्सव असतो. तेथे भाविक पदयात्रेने जातात व अत्यंत विलीभनीय अशा श्रीगणेशाचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात.
श्री चिंतामणी | Chintamani Ganesh | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide
चिंतामणी मंदिराशिवाय कळंब हे गाव पूर्वी मोठे धर्मस्थळ असावे, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे अभ्यासकांना मिळाले आहेत. याशिवाय ऐतिहासिकदृष्ट्याही कळंबचे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून ‘१४ चावड्या व ३२ महालां’चे गाव म्हणूनही ते परिचित आहे. या कळंबमध्येच महर्षी गृत्समद ऋषींनी कापसाचा शोध लावल्याचा उल्लेख काही पौराणिक कथांमध्ये आहे. आचार्य विनोबा भावे यांनीही आपल्या लिखाणात त्यांचा उल्लेख ‘आद्य कापूस संशोधक’ असा केला आहे. औरंगजेबाच्या राजवटीमध्ये या परिसरावर चांदबिबीची सत्ता होती. १८४९ मध्ये नागपूरकर भोसले यांनी कळंब परिसरातील दरी–खोऱ्यांच्या आधाराने इंग्रजांना जेरीस आणल्याच्याही नोंदी आहेत. असे सांगितले जाते की क्रांतिकारक राजगुरू काही काळ भूमिगत होते, तेव्हा त्यांनी चिंतामणी गणेश मंदिरात यवतमाळ जिल्ह्यातील क्रांतिकारक युवकांची गुप्त बैठक घेतली होती.
तुम्ही ही यात्रा केली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा 🙏

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!