वक्रतुंड श्री शमी विघ्नेश | Shami Vignesh Ganpati | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide
विदर्भातील पंढरपूर म्हणून नावारुपाला आलेल्या नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात धापेवाडाजवळ आदासा नावाचं एक लहानसं गाव आहे. हे गाव नागपूरपासून ३५ किमी अंतरावर येतं. या गावात श्रीगणेशाची भव्य त्रिभंगी मूर्ती आहे. तिचं गंडस्थळ तिरपं असल्यानं गणेश नृत्यमुद्रेतील असल्याचं जाणवतं. अर्थात मूर्तीवरील शेंदराच्या लेपामुळं मूळ रुप लक्षात येत नाही. महाराष्ट्रातील २१ गणेशात या शमी विघ्नेशाची गणना होते.
वक्रतुंड श्री शमी विघ्नेश | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide
अठरा फूट उंच, सात फूट रुंद, अष्टभुज आणि वाहन सिंह असलेली ही गणेश मूर्ती आहे. प्रचंड आकारामुळं ती भक्तांना अधिक भावते. तिची पूजा करणं म्हणजे भाविकांची परीक्षाच असते. गाभाऱ्यावर चढल्यावरच तिची पूजा शक्य आहे. नवसाला पावणारा गणेश अशी धारणा आहे.
गणेश कोषातही या गणेशाची माहिती आढळते. या माहितीनुसार प्राचीन काळी पाप आणि दृष्ट प्रवृत्तींचं स्तोम माजलं असताना त्याचं उच्चाटन करण्यासाठी शिव पार्वतीरुपी शमी वृक्षातून हा गणेश प्रगट झाला. म्हणून याला शमी विघ्नेश म्हणतात. संत रामदासांनी त्यांच्या विदर्भ प्रवासादरम्यान या ठिकाणाला भेट दिली होती. नागपूरचे राजे रघुजी भोसले दर संकष्टीला या गणेशाच्या दर्शनाला येत असत. या गणेशाबद्दल एक दंतकथाही आहे. सर्वप्रथम पूजेचा मान असणाऱ्या श्रीगणेशाची बळीराजाकडून अवहेलना झाली. तेव्हा भगवान वामनांनी बळीला त्याच्या शंभराव्या अश्वमेध यज्ञात जिंकण्यास प्रथम आदासा येथे श्रीविग्रह केला. म्हणजेच गणेश स्थापना करुन बळीराजाला युद्धात पराभूत करीत सर्वांचं विघ्न दूर केलं. विशेष म्हणजे या गणपतीला विवाहासंदर्भात नवस बोलला असता तो नवसाला पावतो आणि विवाह जुळतो,अशीही श्रद्धा आहे.
वक्रतुंड श्री शमी विघ्नेश | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide
या गावामध्ये पाच पुरातन मंदिरं आहेत. त्यात महादेवाचंही मंदिर आहे. गावात भोसले काळातील दोन छोटे तलावही आहेत. सुंदर तलावाच्या जवळ असलेलं टेकडीवरील भव्य गणपती मंदिर देखणं आहे. मंदिर उंच असून हेमाडपंथी शैलीनं बांधलेलं आहे. मंदिरावर ठिकठिकाणी सुंदर नक्षीकाम केलं आहे. मूर्तीच्या गाभाऱ्यापासून भुयार असून ते रामटेकच्या श्रीराम मंदिरापर्यंत असल्याचं सांगितलं जातं.
रावणपुत्र इंद्रजीतच्या नाग अस्त्रानं लक्ष्मण जखमी झाल्यावर उपचारासाठी संजीवनी बुटी आणण्यास हनुमान हिमालयात गेले होते. पर्वत खांद्यावर उचलून लंकेकडे जात असताना काही भाग येथे कोसळला आणि त्याच पावनभूमीवर आदासा गाव वसल्याची आख्यायिका आहे.
तुम्ही ही यात्रा केली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा 🙏

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!