नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra
आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असला, तरी मानसिक आणि शारीरिक थकवा त्याला कायम सतावत असतो. हा अनुभव आपणा सर्वांनाही निश्चित येत असणार. अशात मानसिक शांतता कशी आणि कुठे मिळणार? थोडा वेळतरी रोजच्या या दगदगीतून बाहेर पडण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच होत असणार? पण हे शक्य आहे का? हो, नक्कीच आहे. आणि यावर पर्याय आहे, ‘वेलनेस टुरिझम’!
“वेलनेस पर्यटन” ही संकल्पना केवळ प्रवासापुरती मर्यादित नाही, तर ती एक संपूर्ण आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव आहे. हा प्रवास तुमच्या नियमित जीवनातील ताणतणाव कमी करुन मन अधिक स्थिर आणि सकारात्मक करतो. याशिवाय, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतो.
वेलनेस पर्यटन म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहून शरीर, मन आणि आत्म्याला ताजेतवाने करण्याचा प्रयत्न. यात योग, ध्यान, आयुर्वेदिक उपचार, स्पा थेरपी, नैसर्गिक आहार आणि शांत वातावरण यांचा समावेश असतो. शहरातील कोलाहलापासून दूर जाऊन स्वतः शी संवाद साधण्याची ही एक अनोखी संधी असते.
भारतामध्ये वेलनेस पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून आहे. योग आणि आयुर्वेद यांसारख्या शास्त्रांनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केरळमधील आयुर्वेदिक रिसॉर्ट्स, ऋषिकेशमधील योग केंद्रे आणि हिमालयीन परिसरातील ध्यानधारणा स्थळे ही वेलनेस पर्यटनाची उत्तम उदाहरणे आहेत. पण तुम्हाला इतक्या दूर जाण्याची अजिबातच गरज नाही. कारण नागपूर जिल्ह्यातच तुम्ही हा आनंद घेऊ शकता.
Sanjeevan Nature Cure Center
नागपूरपासून सुमारे २२ किमी अंतरावर
हिंगणा तालुक्यात असलेल्या आमगाव देवळी येथे निसर्गरम्य परिसरात वसलेला संजीवनग्राम प्रकल्प यासाठी सज्ज आहे. गेल्या चार दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आणि थ्रोट कॅन्सर सर्जन म्हणून सुविख्यात असलेले डॉ. संजय उगेमुगे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.
निसर्गोपचार आणि योग केंद्र | Sanjeevan Nature Cure Wellness Centre
संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्रात नैसर्गिक उपचार पद्धतींवर आधारित सेवा दिली जाते. त्यात मसाज थेरपी (हॉट स्टोन, व्हायब्रो), स्टीम बाथ, मड थेरपी, अक्युपंक्चर-अक्युप्रेशर, सर्क्युलर जेट बाथ, हिप बाथ, स्पाइनल स्प्रे, शिरोधारा, कोलन थेरपी, ओझोन थेरपी, फिजिओथेरपी आदींचा त्यात समावेश आहे. वजन नियंत्रण, डिटॉक्स, योग-ध्यान यासाठी पाच दिवसांची निवासी शिबिरे घेतली जातात. पुरुष आणि महिलांसाठी वेगळे विभाग आहेत. एक दिवसाच्या भेटीचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात.
Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra
टेकडीवर भव्य शिव मंदिर
संजीवन गोशाळा स्वयंपूर्णतेसाठी सुरू करण्यात आली आहे. गाई-म्हशींद्वारे दूध पुरवठा. शेणापासून बायोगॅस (स्वयंपाक आणि वीज उत्पादन). त्याचा खत म्हणून शेती व बागकामासाठी वापर. धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रमांतर्गत टेकडीवर भव्य शिव मंदिर उभारण्यात आले आहे. ध्यान मंडपात ध्यान, योग, प्रार्थना, मानसिक शांती आणि आरोग्यासाठी उपयुक्त उपक्रम चालविले जातात. पर्यावरण आणि ऊर्जा संरक्षण अंतर्गत सौर ऊर्जा, बायोगॅस, विंड टर्बाइन, वृक्षारोपण, उद्याने, तळे, जल-मृदा संरक्षण, आदर्श ग्राम विकास या सगळ्याच अभिनव गोष्टी संजीवन ग्राममध्ये डॉ. संजय उगेमुगे यांनी उभारल्या आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात...
संजीवनग्राममध्ये वृद्धाश्रमासोबतच विविध सामाजिक, वैद्यकीय आणि पर्यावरणीय उपक्रम चालवले जातात. मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांची सेवा, नैसर्गिक आरोग्य आणि ग्रामीण विकास हा आहे. त्यांनी दोन लाखावर झाडे लावल्याने हा परिसर सौंदर्याने फुलला आहे.गेल्या काही वर्षात त्यांनी निसर्गोपचारासोबत ऑस्टिओपॅथी उपचार सुरु केला आहेत. त्यामुळे अनेक व्याधींवर कमी खर्चात रुग्णांवर उपचार होतो. इथे अनेक आरोग्य शिबिरे चालवली जातात. एकाच प्रकल्पात आणि नैसर्गिक परिसरात सर्व आरोग्य सुविधा असलेले विदर्भातील एकमेव सुसज्ज केंद्र म्हणून संजीवनग्राम नावारूपास आले आहे. संजीवन वृद्धाश्रम (Old Age Home) २००२ पासून सुरू करण्यात आले असून सुमारे २०,००० चौरस फूट क्षेत्रफळाची दोन मजली सुसज्ज इमारत आहे. ५० ज्येष्ठ नागरिकांच्या राहण्याची क्षमता असून स्वतंत्र खोल्या, स्वयंपाकघर, डायनिंग हॉल, ध्यान मंडप आहे. समर्पित स्वयंसेवक आणि कर्मचारी वृद्धांची देखभाल करतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कॉटेजेस उपलब्ध आहेत.
बाबा आमटेंकडून घेतली प्रेरणा | Inspired by Baba Amte
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रद्धेय बाबा आमटे यांनी रुग्णसेवेतून सामाजिक परिवर्तन घडवले. लाखो तरुणांना त्यांनी सामाजिक सृजनशीलतेचा मार्ग दाखवला. बाबांचे आनंदवन असो, सोमनाथची भारत जोडो श्रम संस्कार छावणी असो किंवा हेमलकसा भामरागडचा आदिवासींसाठी उभारण्यात आलेला लोक बिरादरी प्रकल्प, ते तरुणांना सामाजिक जाणिवेने मार्गस्थ करीत असतात. बाबांचे सुपुत्र डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांनीही रुग्णसेवेची कास धरली. कालांतराने तरुणांची एक खूप मोठे फळी निर्माण झाली. बाबांनी त्यांना युवाकम्प असे म्हटले. बाबांनी दिलेली शिकवण आणि आशीर्वाद घेत अनेक तरुणांनी देशाच्या कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि आरोग्याचे प्रकल्प उभारले. यात अनेक डॉक्टरही होते. त्यात नागपूरचे डॉ. संजय उगेमुगे हे नाव अग्रस्थानी आहे.'संजय तू डॉक्टर झालास, गरिबांची सेवा करायला विसरू नकोस' हा बाबांनी दिलेला मंत्र डॉ. संजय उगेमुगे यांनी इतका मनावर घेतला की नागपूरनजीक संजीवन ग्राम उभे राहिले. वृध्दाश्रमापासून सुरुवात झालेल्या या प्रकल्पात सर्वोत्तम निसर्गोपचार, ऑस्टियोपॅथी, योगा, आधुनिक शेती असे कितीतरी उपक्रम सुरु झालेत.
नागपूर जिल्ह्यातील हा प्रकल्प विदर्भातील लोकांना नवसंजीवनी देणारा निश्चित आहे. प्रत्येकाने एकदा तरी या निसर्गरम्य संजीवन ग्रामला अवश्य भेट द्यावी.
डॉ. संजय उगेमुगे
९६१९१११८८८
९८२२४७००११
या मोबाईलवर अवश्य संपर्क साधावा
Author
विकास झाडे
ज्येष्ठ पत्रकार



amazing center wellness.
ReplyDeleteछान सेंटर आहे डॉ उगेमुगे यांच
ReplyDeleteWellness tourism is great. I have visited this place.
ReplyDeleteDr Ugemuge has done great initiative in sanjeevan
ReplyDeleteThis center is good. Congrats Dr. Ugemuge
ReplyDeleteवेलनेस टूरिज्म चा चांगला अनुंभव आहे. अशे अजून ठिकाण विदर्भात असावे
ReplyDeletegood article
ReplyDeleteGood platform
ReplyDeleteGreat
ReplyDeleteExcellent and Affordable
ReplyDeletegood
ReplyDeleteNice
ReplyDelete